नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या उतारवयात पेन्शन मिळावी या उद्देशाने सरकारने प्रधानमंत्री किसान मानधन योजना चालू केले आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर तीन हजार रुपये मासिक पेन्शन मिळते. या योजनेविषयी सर्व काही आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.
पीएम किसान मानधन योजना काय आहे.?
पीएम किसान मानधन योजना ही एक शेतकऱ्यांसाठी योजना आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना वयाचे साठ वर्षानंतर मासिक तीन हजार रुपये पेन्शन दिली जाणार आहे. या योजनेत शेतकऱ्यांना सहभाग घेण्यासाठी नोंदणी करावी लागते. या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्ही महा-ई-सेवा केंद्रांमध्ये जाऊन अर्ज करू शकता किंवा तुम्ही स्वतः ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. पीएम किसान मानधन योजनेची अधिकृत वेबसाइटची लिंक खाली देण्यात आली आहे.
तीन हजार रुपये पेन्शन साठी ऑनलाईन अर्ज.
👇
👉 येथे क्लिक करा 👈
पीएम किसान मानधन योजना या योजनांमध्ये 18 ते 40 वयोगटातील शेतकरी सहभाग घेऊ शकतात. या योजनेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्याचे मासिक उत्पन्न rs.15000 पेक्षा कमी असले पाहिजे. या योजनेत महिना 55 रुपये ते दोनशे रुपये एवढीशी छोटी गुंतवणूक करावी लागते. वयाच्या 60 वर्षानंतर तीन हजार रुपये पेन्शन मिळते. या योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड आणि बँक पासबुक हे आहेत.
पीएम किसान ई-केवायसी करण्यासाठी
👇
👉 येथे क्लिक करा. 👈