नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती करत असताना शेतकऱ्यांना अनेक वेळा अपघातांनाही सामोरे जावे लागते. राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, विज पडणे, पूर, सर्पदंश विचूदुंश,विजेचा शॉक बसणे इ. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, तसेच इतर कारणामुळे होणारे अपघात, यामुळे दरवर्षी बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू होतो काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे त्या कुटुंबावर आर्थिक संकट येते. अशा अपघात ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक लाभ देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही सरकारने आणली आहे.
राज्यातील अपघातग्रस्त शेतकऱ्यास व त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरता राज्यातील सर्व वहीतीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहीतीधारक खातेदार म्हणून नसलेले कोणताही एक सदस्य असे दहा ते 75 वयोगटातील एकूण दोन जणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत लाभ मिळतो.
शेतकऱ्यांच्या वतीने सरकार आवश्यक विमा हप्ता भरते. त्यामुळे शेतकऱ्यांना अपघात झाल्यास विमा चा लाभ मिळतो.
शेतकऱ्याचा अपघात झाल्यास नुकसान भरपाई किती मिळते ?
- अपघाती मृत्यू - 2 लाख रुपये /-
- अपघातामध्ये दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास - रुपये 2 लाख
- अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास - रुपये 1 लाख/-
अर्ज करण्याची पद्धत आणि कागदपत्रे