नमस्कार मित्रांनो, देशातील रेशन कार्डधारकांना आता सप्टेंबर नंतरही मोफत दान्य मिळणार आहे. रेशन कार्ड धारकांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे.
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना मोदी सरकारने सुरू केलेली योजना आहे कोरोना प्रादुर्भावाच्या काळात ही योजना सुरू करण्यात आली होती. या आधीही सरकारने या योजना ला अनेक वेळा मुदतवाढ दिलेली आहे. आता सप्टेंबर नंतरही लोकांना मोफत धान्य देण्याच्या विचारात सरकार आहे. याबाबत अन्नसचिव सुधांशू पांडे यांनी माहिती दिली आहे.
पंतप्रधान गरीब कल्याण अन्य योजनेअंतर्गत लोकांना पाच किलो तांदूळ आणि एक किलो गहू मोफत दिला जातो. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी सुधांशू पांडे म्हणाले की सप्टेंबर नंतरही लोकांना मोफत धान्य योजना सुरू ठेवावी लागेल. सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. सरकारने मार्चपर्यंत या योजनेवर सुमारे दोन पॉईंट सात लाख कोटी रुपये खर्च केले आहेत आणि सप्टेंबर पर्यंत 80 हजार कोटी रुपये खर्च केले जातील. एकूण खर्च सुमारे तीन लाख 40 हजार कोटी रुपयावर नेला जाईल.
Tags:
ration card updates