Breaking News नमस्कार मित्रांनो, महावितरण कंपनी च्या कर्मचाऱ्यांनी जो संप पुकारला होता हा संप माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर मागे घेण्यात आला आहे. माननीय उपमुख्यमंत्री यांनी महावितरणच्या 35 संघटनांशी चर्चा केली तसेच त्यांचे म्हणणे काय आहे मागण्या काय आहेत हे समजून घेतले. संकटनांचे मागणे असे होते की राज्य शासनाने महावितरण मध्ये खाजगीकरण आणू नये. यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की महावितरण कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारे खाजगीकरण आणले जाणार नाही. तसेच राज्य शासनाची खाजगीकरण आणण्याची कोणतीही भूमिका नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.